अन्नधान्य, भाज्या आणि इंधन महागले
नवी दिल्ली – मार्च महिन्यात भाजीपाला, अन्नधान्य आणि इंधनाचे दर बरेच वाढल्यामुळे घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर वाढून 3.18 टक्क्यावर गेला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात हा दर वाढल्याचे दिसून आले.
फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर 2.93 टक्के तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर 2.74 टक्के एवढा होता. फेब्रुवारी महिन्यात भाजीपाल्याचे दर 6.82 टक्क्यांनी वाढले होते. तर मार्च महिन्यात भाजीपाल्याचे दर 28.13 टक्क्यांनी वाढले आहे.
मात्र, मार्च महिन्यात बटाट्याचे दर केवळ 1.30 टक्क्यांनी वाढले जे की फेब्रुवारी महिन्यात 23.40 टक्क्यांनी वाढले होते. मार्च महिन्यात हे एकूणच अन्नधान्याच्या महागाईचा दर 5.68 टक्के एवढा भरला आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ किमतीवरील आधारित महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यात किरकोळ किमतीवरील महागाईचा दर 2.86 टक्के एवढा भरला आहे. जो की गेल्या वर्षी मार्च महिन्यात 2.57 टक्के एवढा होता.
रिझर्व्ह बॅंक पतधोरण तयार करताना किरकोळ किमतीवरील महागाईच्या आकडेवारीचा विचार करीत असते. बॅंकेने एप्रिल ते सप्टेंबर या काळात घाऊक महागाईचा दर दोन ते तीन टक्के राहील असे म्हटले आहे. मात्र मार्च महिन्यात ही मर्यादा ओलांडली आहे.