नगर -करोना विषाणूवर मात करण्यासाठी महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी नोकरी, व्यवसाय गमावावे लागल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यावर मात करत युवकांनी व्यवसाय, नोकरी संभाळून समाजसेवा करावी असे, आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वैदूवाडी येथे आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुरज शिंदे यांच्यावतीने दीडशे कुटुंबांना अन्यधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक संजय चोपडा, जालिंदर शिंदे, ऍड. विक्रम शिंदे, शिवा शिंदे, काशिनाथ शिंदे, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून करोना संसर्ग विषाणूच्या काळात संकटात सापडणाऱ्या गोरगरिब गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. वैदूवाडी येथील दीडशे कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.