लखनौ- उत्तर प्रदेशात करोनामुळे जे बळी गेले आहेत, त्याला केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहेत व ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा शब्दांत एका माजी आयएएस अधिकाऱ्याने योगींवर टीका केली आहे.
गंगा नदीत प्रेते आढळल्या नंतर उत्तर प्रदेश सरकारच्या करोना विरोधातील रणनीतवर चौफेर टीका होत असताना माजी अधिकारी असलेले सूर्य प्रताप सिंह योगींवर ट्वीटरच्या माध्यमातून सातत्याने निशाणा साधत आहेत.
करोनाने लाखो लोकांचा राज्यात मृत्यू झाला असून त्याची जबाबदारी योगींवरच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना एकाच वेळी श्रध्दांजली वाहिली जात असल्याचा व्हिडिओही त्यांनी यावेळी व्हायरल केला आहे.