लखनऊ – उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बबदलण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे मुघल काळात ज्या शहरांना किंवा जिल्ह्यांना नावे देण्यात आली होती ती सर्व नावे बदलून मुगलकालीन खुणा पुसण्याचे धोरण योगी सरकार राबवणार आहे.
आगामी कालावधीमध्ये अलिगड सुलतानपूर बदायू फारुखाबाद फिरोजाबाद शहाजहानपूर या शहरांची नावे बदलण्यात येणार आहेत मुख्यमंत्री होण्यापूर्वी योगी खासदार होते त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रदेशातील अनेक शहरांची आणि प्रदेशांची नावे बदलली होती.
गोरखपूर परिसरातील उर्दू बाजारचे हिंदू बाजार हुमायुन बाजारचे हनुमान बाजार मीना बाजारचे मायाबाजार असे नामांतर करण्यात आले होते मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये आदित्यनाथ यांनी मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन असे केले होते लाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून आयोध्या असेही करण्यात आले होते अद्यापपर्यंत शहरांची नवीन नावे काय असतील ते ठरवण्यात आले नसले तरी काही सूचना मागवण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे आलीगडचे नाव बदलून आर्यगड असे होऊ शकते आणि फरुखाबादचे नाव पांचाळ नगर असे होऊ शकते फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून चंद्रनगर करण्याची सूचना आली आहे सुलतानपूरचे नाव बदलून कुशभवनपूर असे करण्यात येणार आहे.