कोल्हापूर(प्रतिनिधी) – पुण्यातील येरवडा येथे बांधकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. मृत कामगारांच्या वारसांना शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते कोल्हापूरात बोलत होते.
पुढे मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या दुर्घटनेत नऊ लोक जखमी झालेले आहेत व पाच लोक मृत्यू झालेले आहेत. हे बांधकाम मंडळाकडे नोंदीत नव्हते. दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारचा अपघात पुण्यामध्ये झाला होता. नोंदीत नसलेल्या कामगारांना त्यांच्या वारसांना 5 लाख रुपये प्रत्येकी देण्यात आलेले होते. आज बांधकाम कामगार मंडळाच्यावतीने या पाचही कामगार जे दुर्दैवाने मृत्यू वापलेले आहेत त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याचा निर्णय आज शासन घेत आहे. त्याशिवाय जे दुर्दैवाने मृत्यू झालेले आहेत आणि जे जखमी आहेत. जखमींचा संपूर्ण खर्च व जे मृत्यू पावलेले आहेत त्याच्या अंत्यविधीसाठी त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था कंत्राटदार अहलू वालीया यांनी करण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी दिलेले आहेत.
पुढे ते म्हणाले की, पाच व्यक्तींचे दुदैवी निधन झालेलं आहे. त्याबद्दल मला अतिशय दु:ख झालेलं आहे. यापुढच्या काळात असे अपघात होऊ नयेत किंवा जे बांधकामावर काम करतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत बिल्डर किंवा काॅन्ट्रॅकटरने नोंदीत केलच पाहिजे, अशा प्रकारचा आदेश लवकरच काढणार आहोत. ही संपूर्ण जबाबदारी बिल्डिंगवाला आणि कॉन्ट्रॅक्टर यांची असेल असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.