मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकेसाठी सर्वांनाच परिचीत आहे. तसेच त्या आपल्या ट्विटरवरून देखील राजकीय टीका करताना दिसतात. मात्र सध्या त्या, त्यांनी मांडलेल्या एका लॉजिकमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी मुंबईत होणाऱ्या घटस्फोटासंदर्भात एक लॉजिक मांडलं आहे. मुंबईत प्रचंड वाहतुक कोंडी असून मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.
भाजपतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
आज मुंबईत ट्रॅफिकमुळे किती टक्के घटस्फोट होतात, हे तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न करत अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाचं प्रमाणही सांगितलं. वाहतुक कोंडीमुळे मुंबईत ३ टक्के घटस्फोट होतात, कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, आणि हे बोलणार नाही तर कसं होणार, असंही त्या म्हणाल्या.