लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात प्रमुख विरोधी पक्ष आणि देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस हे सखोल विचारमंथन करत आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी अनेक आव्हानांवर मात करणे हे काँग्रेससाठी महत्त्वाचे काम आहे. तर याचसोबत यंदाच्या आगामी लोकसभा निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी रंगणार आहे.
या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. तर गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीही इंडिया आघाडीत सामिल होण्यास इच्छुक आहे. मात्र अशीही चर्चा आहे की काँग्रेसबरोबर असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे हे गणित जुळत नसल्याचं दिसत, अशात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली
अशोक चव्हाण म्हणाले,वंचितने महाराष्ट्रात ठाकरे गटाबरोबर सख्य जमवलं असलं तरीही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत त्यांना अधिकृत स्थान मिळालेलं नाही. याबाबत चर्चा होणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.’
दरम्यान, काँग्रेस अखिल भारतीय समितीची २९ डिसेंबरला जागा वाटसंदर्भात बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात धोरण ठरवलं जाईल. ही पक्षनिहाय बैठक असेल. प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी बोलावून त्यांची मते लक्षात घेऊन अंतिम स्वरुप करता येईल’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.