मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर सुरु झाल्या कोर्टाच्या तारखा, दावे प्रतिदावे आणि पुरावे. शिवसेनेसोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केलं. शिवसेनेत उभी फूट पडली आणि ठाकरे शिंदे गट तयार झाले. दोन्हही गटांनी न्यायालयात दाद मागितली आणि सुनावणी पार पडली. आता या सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. सुनावणीचा निकाल केव्हा येणार याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. या सर्व घडामोडींचा निकाल ११ मे किंवा १२ मे २०२३ रोजी येण्याची शक्यता सरोदे यांनी वर्तवली आहे.
असीम सरोदे यांनी तब्बल चार ट्विट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी या निकालामध्ये येणाऱ्या शक्यता वर्तवल्या आहेत. ट्विटमध्ये ते म्हणतात,”महाराष्ट्रसत्तासंघर्ष प्रकरणी निकाल 11 किंवा 12 मे 2023 ला लागेल. निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात.” असे म्हणून त्यांनी मुद्देसूद आपले म्हणणे मांडले आहे.
1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.
2. गव्हर्नर भगत कोशियारी यांनी जो आदेश काढून फ्लोअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमतचाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो.
शक्यता 3. पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.
शक्यता 4. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते.
#महाराष्ट्रसत्तासंघर्ष प्रकरणी निकाल 11 किंवा 12 मे 2023 ला लागेल.
निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात.
1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.— Asim Sarode (@AsimSarode) May 9, 2023
राज्यात न भूतु न भविष्यती असं राजकारण पाहायला मिळाल आहे.शिंदे गटाचे दावे आणि ठाकरे गटाचे दावे इलेकट्रोनिक मीडियाद्वारे थेट महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेने पाहिले आहेत. त्यामुळे या राजकीय बदलाचा निकाल नेमका काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागू शकतो असा अंदाज अनेक कायदे अभ्यासक व्यक्त करताना दिसत आहे.