Delhi Pollution – दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषण (Delhi Pollution) सातत्याने वाढत आहे. याबाबत एका नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. प्रदूषणाचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरावर कायमस्वरूपी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड, न्या. जे.बी.पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही पूर्णपणे धोरणात्मक बाब आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा समित्या स्थापन केल्यास प्रदूषण संपेल, असे तुम्हाला वाटते का?’
खंडपीठाने जनहित याचिका ऐकण्यास नाखूषी व्यक्त केल्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलाने याचिका मागे घेतली. याचिका मागे घेतल्यावर याचिका फेटाळण्यात आली असे मानले जाते.
अजय नारायणराव गजबहार यांनी ही याचिका न्यायालयात दाखल करून प्रदूषणाचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरावर कायमस्वरूपी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.