नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडीत युवतीने सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्र उशीरा मिळाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हे पत्र आपल्या निदर्शनास का आणून दिले गेले नाही, याबाबतचा अहवाल न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवालयाकडे मागितला आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना उद्देशून उन्नाव बलात्कार पीडीत तरुणीने लिहीलेल्या पत्रामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. हे पत्र अद्याप उघड झालेले नाही. हे पत्र आपण वाचले असल्याचे अद्याप वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेले नाही, हे दुर्दैव आहे, असे सरन्यायाधीश गोगोई म्हणाले.
सरन्यायाधीशांनी कोणतीही कारवाई केली नाही, अशा आशयाचे वार्तांकन वर्तमानपत्रांनी केल्याबद्दल न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांचाही समावेश असलेल्या पिठाने दुःख व्यक्त केले. या अत्यंत अस्थिर परिस्थितीबाबत अम्ही निश्चितच काही तरी करू असेही न्यायालयाने सांगितले. न्यायालयाला सहाय्य करणारे वरिष्ठ विधीज्ञ ऍड. व्ही. गिरी यांनी उन्नाव् बलात्कार प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केल्यावर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. उन्नाव बलात्कार पीडीतेला झालेल्या अपघाताच्या तपासाचा अहवालही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडे मागितला. या संदर्भातील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.