परवेझ मुशर्रफ यांनीदेखील आळवला काश्मीरी राग
लाहोर : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या बाबतीत जो धाडसी निर्णय घेतला त्याचा पाकिस्तानकडून कडाडून विरोध केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची गोची करणाऱ्या पाकिस्तानने अजूनही काश्मीरी राग गायचे बंद केले नाही. त्यातच आता पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीदेखील काश्मीरविषयी वक्तव्य केले आहे. काश्मीर हा पाकिस्तानच्या रक्तात आहे आणि काही झाले तरी पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ बऱ्याच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते मात्र राजकारणात पुन्हा प्रवेश करताना त्यांनी काश्मीरच्या मुद्याच्या आधार घेतला आहे. दुबईत ववास्तव्यास असणारे जनरल मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाचा संदर्भ देत पाकिस्तानचा शांतता प्रयत्न असूनही भारत त्यांना वारंवार धोका देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या अध्यक्षांनी रविवारी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त दुबईहून दूरध्वनीवरून इस्लामाबादमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. “कदाचित, भारतीय लष्कर कारगिलची लढाई विसरला असेल.” 1999 मधील कारगिल युद्धाचा अंत करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मदत घ्यावी लागली होती, असा दावादेखील माजी हुकूमशहाने केला आहे.
काश्मीर पाकिस्तानच्या रक्तात आहे. काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्यानंतर मुशर्रफ यांचे विधान पहिल्यांदाच आले आहे. ते म्हणाले, ‘काहीही झाले तरी आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांसोबत उभे राहू. पाकिस्तानी आणि सैन्य त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तान सशस्त्र सेना भारताच्या कोणत्याही धाडसाला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असल्याने पाकच्या शांततेची इच्छा हे तिचे दुर्बल समजले जाऊ नये, असे मुशर्रफ म्हणाले.
परवेझ मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत आहेत. 2007 मध्ये घटना स्थगित केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आहे. या प्रकरणात, 2014 मध्ये त्याच्यावर आरोप ठेवले गेले. देशद्रोहाच्या प्रकरणात दोषी ठरल्यास जन्मठेपेची शिक्षा किंवा जन्मठेपेची तरतूद आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होत असताना मुशर्रफ पुन्हा सक्रिय राजकारणाकडे परत येण्याची योजना आखत आहेत.