एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता… ? राग येतो, चीड येते.. रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सूनावतो आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर ना!!
बऱ्याचदा बरेच लोक आपल्याला भेटत असतात, अश्यावेळी काहींचे स्वभाव आणि मत आपल्याला पटत नाही, मग भांडण-वाद होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींमुळे नातेसंबंध आणि घरातील जवळच्या व्यक्तीवर परिणाम होतो. यामध्ये आपल्या कुटुंबापासून ते मित्रमैत्रणी आणि ऑफिस स्टाफ (सहकारी) अश्या अनेक लोकांचा समावेश असतो. याच लोकांचे वागणे बोलणे आपल्याला सतत खटकले, आवडले नाही तर त्याचा त्रास आपल्याला होतो. मानसिक विचार वाढतो, पुरेशी झोप होत नाही त्याने शारीरिक त्रास देखील वाढतो. या सगळ्या त्रासाला सामोरे जाण्यापेक्षा आपण यात नेमके काय बदल केले पाहिजे ज्याचा आपल्याला फायदा होईल अश्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. नेमके कोणते आहेत ते उपाय आपण जाणून घेऊयात…
1 दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा. आयुष्य हे दिवसांचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा.
2 सगळ्यात पहिले तर आपल्या बोलण्यावर आपला ताबा ठेवा, कोणाबरोबर जर वाद झाला तर तो काय बोलतो ते आधी नीट ऐकून घ्यावे, कोणालाही लगेच तडकाफडकी उत्तर देऊ नये.
3 समोरचा व्यक्ति बोलून झाल्यानंतर आपण पूर्ण विचार करून म्हणजे मी त्याला किंवा तिला असे बोललो तर कसं वाटेल, माझ्या बोलण्याने त्याला किंवा तिला राग तर नाही ना येणार, माझ्यामुळे त्याचे किंवा तिचे मन दुखावले तर जाणार नाही ना. याचा विचार करा.
4 स्वत:साठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा. माझा आत्मविश्वास चांगला नाही, मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करु शकत नाही अशाप्रकारचे शब्द, वाक्य बोलणं टाळा. यामुळे नकळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल.
5 पोटभर खाणे शक्यतो टाळा. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तरी पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा. यामुळे कदाचित तुमचा मूड, तब्येत चांगली राहण्यास मदत होईल आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवरही चांगला परीणाम होऊ शकतो.
6. एकादा सहकारी, कुटुंबातील व्यक्ती सातत्याने तुम्हाला चिड येईल असे वर्तन करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही असेल त्याला दाखवून द्या. काही दिवसांत अपोआप तो तुम्हाला टोचून बोलणे थांबवेल.
7. प्रत्येकाचा एक काळ असतो. त्यामुळे काही वेळा दुसऱ्याने बोललेले सहन करा. जाणून बुजून तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर ते फार काळ टीकत नाही. त्याला त्याच्या कर्माची फळं काही काळानंतर आपोआप मिळतात. हे तुम्हीही अनुभवले असेल. त्यामुळे कधीही तुम्हाला एखाद्याचा राग आला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घ्या. सारासार विचार करा. शक्यतो काही वेळानंतर तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देणे टाळाल. कारण जर तुम्ही लगेच प्रत्युत्तर दिले तर वाद वाढेल आणि त्याचा तुम्हालाही त्रास होईल.