तिरुअनंतपुरम – धर्मनिरपेक्षता हा भारतीय लोकशाहीचा मूलभूत स्तंभ आहे. परंतु, आता धर्मनिरपेक्ष हा शब्द सत्तेत असलेल्यांकडून अपमानास्पद म्हणून वापरला जात आहे. यामुळे समाजात ध्रुवीकरण होत आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या साेनिया गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला.
सोनिया गांधी यांनी सामान्य ज्ञानाच्या पुस्तकातील एका लेखातून लोकशाहीला धरून केंद्रावर टीका केली. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस पक्ष लोकशाहीसाठी वचनबद्ध आहेत, परंतु सत्ताधारी लोकशाहीच्या सुरक्षेला कमकुवत करत आहेत. आपल्या देशाला एकात्मतेकडे नेणारे मार्ग नष्ट होत आहेत. त्यामुळे समाजात ध्रुवीकरण पसरत आहे.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे एकमेकांशी जोडलेले असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. त्या म्हणाल्या की धर्मनिरपेक्षतेची व्याख्या अनेक प्रकारे केली जाते. परंतु भारतासाठी याचा अर्थ महात्मा गांधींनी काय म्हटले आहे – सर्व धर्म सम भाव.
महात्मा गांधी आणि जवाहर नेहरू यांनी सर्व धर्मांची एकता समजून धर्मनिरपेक्ष राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न केले. राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनीही हा विचार विकसित आहे आणि सरकारला लागू केला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाही निर्माण झाली.