सामान्य माणूस मनातून पुरता निराश झालायं. करोनाच्या संकटाने मारा केलाय. त्या माणसाची व्यथा मांडणारी ही रचना
माणसा तु घाबरलास का रे..?
या रोगाने सर्वत्र हाहाकार माजवलाय..
अर्थव्यवस्थेचा पार चुराडा झालाय…
अन्नाचा तुटवडा भासु लागलाय…
अन् गरीब पुरता हताश झालाय ना रे !
माणसा तु घाबरलास का रे..?
दिवसेंदिवस आकडा वाढू लागलाय.
जो-तो त्याबद्दलच बोलु लागलाय
सगळ्यांना मनाचा ठोकाच चुकलाय.
अन शंकांच वादळ मनात भिनलय ना रे..!
माणसा तु घाबरलास का रे..?
शहरातील गर्दी नाहिशी झालीय.
गावातला पार सुद्धा एकटा पडलाय
शाळेतल्या पोरांचा गलकाही शांत झालाय.
सवंगड्यांचा घोळका हरवून गेलाय ना रे..!
माणसा तु घाबरलास का रे..?
पण असं घाबरून चालणार नाही..
या करोनासमोर हारुन चालणार नाही…
बघ प्रत्येकजण याचा सामना करु लागलाय…
अनेक संकटातून आपण कितीदा विजय मिळवलाय ना रे..!
माणसा तु घाबरलास का रे..?
अश्विनी परकाळे
नगर.संपर्क : 7249076601
जागतिक महामारीच्या या संकटात लपलेली संधी ओळखून त्याचे चीज करणे गरजेचे झाले आहे. राज्यातील परप्रांतीय कामगार परत जात आहेत. त्यामुळे राज्यातील उद्योग कसे सुरु राहतील, याची चिंता सर्वांना लागली आहे. सर्वच क्षेत्रांत परप्रांतीय मजुरांचा राबता होता. त्यामुळे हे मजूर पुन्हा आपल्या गावाकडे वळाल्याने उद्योग व्यवसायासमोर अनेक अडचणी तयार होतील, अशी भावना महाराष्ट्रातील उद्योजकांची झाली आहे. मात्र, ही देखील एक संधी आहे. महाराष्ट्रातील तरुणांना असंख्य रोजगाराच्या संधी यातून निर्माण होणार आहेत. वेळेला भेटेल ते काम करायची तयारी ठेवली पाहिजे. कोरोनाच्या या संकटानंतर आपल्याला महाराष्ट्र पुन्हा नव्याने उभा करावा लागेल. आता नोकरी नाही, म्हणून रडण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करून मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आता या तरुण पिढीने आपल्या कल्पकतेने महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. आपणच पुढे येऊन महाराष्ट्र मजबूत करूया, या संकट काळातही मिळालेल्या या संधीचे सोने करू या.
मोईन पठाण
रा. मेहेंदुरी, ता. अकोले.
संपर्क : 8411994650