कोलकाता – येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला पराभूत करून देशातील अराजकता संपुष्टात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. देशात सन 2024 साली लोकांचे सरकार आणण्यासाठी आता व्यापक प्रयत्न करायला पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
आज राज्य विधानसभेत बोलताना त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी राज्यात येऊन केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, अन्य राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अत्यंत चांगली आहे. बंगालमध्ये ममतांच्या काळात भ्रष्टाचार आणि हिंसाचार वाढल्याचा आरोप नढ्ढा यांनी अलीकडेच केला होता.
बीएसएफने राज्याच्या सीमावर्ती भागात “दहशत” पसरवल्याचा आरोपही ममतांनी केला. त्या म्हणाल्या की, सीमावर्ती भागात निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. या हत्यांच्या चौकशीसाठी केंद्राकडून कधीच तपास पथके पाठवली जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
Jharkhand : कॉंग्रेसच्या चार नेत्यांचे ‘या’ कारणामुळे पक्षातून निलंबन
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोकांना गाईला मिठी मारण्यास सांगणारी जी अधिसूचना केंद्र सरकारने काढली होती त्याचीही ममतांनी खिल्ली उडवली.