मुंबई – शनिवारपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले असून मुंबईकराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आर्थिक नुकसानासह काही ठिकाणी जीवीत हानी देखील झाली आहे. अशातच आज पुन्हा मुंबईसह नऊ जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने आज (सोमवार) रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात रेड व ओरेजं इशारे
Severe weather warnings by IMD today for Maharashtra for 19-23 Jul.
Entire Konkan & parts of madhya Mah r on Red Alert today. D2,3 Orange alert issued
Parts of marathwada,Vidarbha r likely to covered with Yellow alert during period.
Watch IMD updates pl. pic.twitter.com/DaYND84h2w— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2021
पुढील तीन तासांत मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. या काळात लांबचा प्रवास टाळवा, मोठ्या झाडाखाली उभे राहू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.
विदर्भ, दक्षिण महाराष्ट्राला येलो अलर्ट –
मागील काही दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने काहीसी विश्रांती घेतली आहे. आज संपूर्ण विदर्भाला आणि दक्षिण महाराष्ट्राला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात.