मुंबई – 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. ते मुंबईत “इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. इंडियाचे आजचे चित्र पाहून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा आता कोणत्याही स्थितीत विजय शक्य नाही. या प्रकरणी आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे.
भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत, असेही राहुल यांनी पुढे म्हटले.
रशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे ही बैठक आयोजित केल्याबद्दल राहुल गांधी यांनी त्याचे आभार मानले आहे.
भाजप हे भ्रष्टाचाराचे घर
देशाच्या विकासासाठी शेतकरी, कामगार आणि देशातील गरीब जनतेचा मोठा हात असतो, यांच्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत. आम्ही इंडियासाठी एकत्र आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे घर झाले आहे.
त्यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहीजे. त्यांनी चौकशी केली नाही तर ही मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल. सध्या भाजप गरीबांचे पैसे निवडक लोकांना देते आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.