मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
यातच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना या संपूर्ण घटनेवर आपलं मत मांडल आहे. माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले,’ज्यांना सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी ते पाडून दाखवलं. आता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. तसेच ठाकरे परिवाराला सत्तेची लालसी कधीच नव्हती. पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज जे विरोधात बोलत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं पालन पोषण शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालं आहे.’ असं देखील राऊत म्हणाले आहे.
तसेच राऊत यांनी ट्विट करत भाजप नेत्यांना टोला लगावला आहे की,’नव्या मुख्यमंत्र्यांच्या विषय पत्रिकेवरील पहिला विषय : किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या आमदारांचे प्रताप वॉशिंग मशिनमधून साफ करून घेणे आणि नंतर त्यांना क्लीनचिट देणे !’ असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांच्या विषय पत्रिकेवरील पहिला विषय :
किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या आमदारांचे प्रताप वॉशिंग मशिनमधून साफ करून घेणे आणि नंतर त्यांना क्लीनचिट देणे !— Dr. Vijay Chormare (@DrVijayChormare) June 30, 2022