मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना हा निकाल उद्याच लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल देण्याचे वक्तव्य सरन्यायाधीश यांनी केले आहे. दरम्यान, उद्याच्या निकालानंतर राज्यातील सरकार राहणार की कोसळणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
सुनावणीसंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही कायदेतज्ज्ञ 16 आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत.
दरम्यान, यासर्व घटनेवर आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. “सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निर्णयाबाबत आम्ही आशादायी आहोत. आमच्या सरकारला काहीही होणार नाही’, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी नेमकं फडणवीस काय म्हणाले पाहा…
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल,16 मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हापासून निकालाची प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे. असं ते म्हणाले.
सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधीच अनेक राजकीय पंडितांनी आणि प्रसारमाध्यमांनी परस्पर निर्णय जाहीर करुन टाकला आहे. एवढेच नव्हे त्यावर भविष्यातील राजकीय समीकरणं आणि नव्या सरकारबाबत भाकीते केली आहेत. हा प्रकार योग्य नसून, सर्वांनी निकाली वाट पाहिली पाहिजे”. असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.