नवी दिल्ली :- देशात मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेने 7 ते 15 जुलै दरम्यान 700 हून अधिक मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 600 मेल आणि एक्स्प्रेस आणि 500 पॅसेंजर गाड्याच्या मार्गांवर पाणी साचल्याने त्याचा परिणाम झाला आहे.
वायव्य राज्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
उत्तर रेल्वेने 300 मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या, 100 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि 191 ट्रेन वळवण्यात आल्या. उत्तर रेल्वेने 406 प्रवासी गाड्या रद्द केल्या, 28 गाड्या वळवण्यात आल्या आणि 54 गाड्या पाणी साचल्यामुळे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या.