केडगाव -केडगाव आणि परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व ठिकाणी हाहाकार उडाला असुन नागरिक भयभीत झाले आहेत. अशातच केडगावसह दापोडी, बोरीपार्धी, चौफुला वाखारी, खोपोडी, खुटबाव इत्यादी गावातून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला, या पावसाने गहू, हरभरा, फुलशेती, फळबागा, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एका बाजूने करोना तर दुसऱ्या बाजूने अवकाळी अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.