वाघोली – येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये असणाऱ्या काळुबाई नगर परिसरात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरासमोर साचल्याने ये जा करण्यात नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत भाजप नेते संदीप सातव यांनी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी इरफान शेख यांच्याकडे पाठपुरावा करून शेख यांच्या टीमच्या मदतीने काळुबाई नगर मधील पावसाचे पाणी काढण्यात आले असून नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप नेते संदीप सातव यांनी सांगितले की वाघोली मधील काळुबाई नगर मध्ये पावसाचे पाणी घरासमोर साचल्याने नागरिकांना येजा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी इरफान शेख यांच्याकडे पाठपुरावा करून इरफान शेख व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काळुबाई नगर मधील रस्त्यावर असणारे पावसाचे पाणी काढून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.