Entertainment : अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. विवेक आणि ऐश्वर्या रायच्या रिलेशनशीपच्या चर्चा अनेकदा रंगल्याचे पाहायला मिळाले. विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विवेकने अनेक मुलाखतींमध्ये ऐश्वर्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. परंतु, ऐश्वर्याने कायमच याविषयी मौन बाळगलं. त्यानंतर विवेकनं त्याच्या आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपवर भाष्य केले आहे.
विवेकनं त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. विवेक एका मुलाखतीत म्हणाला की, ‘ऐश्वर्याला डेट करत असताना हे नातं तोडण्यासाठी मला धमक्या येत होत्या. तसंच मला जबाबदारी झटकण्याची किंवा दिलेलं वचन मोडण्याची सवय नाही. पण लोकांनी त्यांनी मला दिलेलं वचन कधीच पूर्ण केलं नाही, त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही, असंही तो म्हणाला.
सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झाले तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर विवेकची ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची भेट झाली, त्यानंतर विवेक आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक वाढू लागली. लमानसोबत ब्रेकअप झालेल्या ऐश्वर्याला विवेकने आधार दिला त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु काही काळानंतर ऐश्वर्या आणि विवेकचं नातं संपुष्टात आलं. ऐश्वर्यासोबतच्या नात्यादरम्यान सलमानने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खुलासाही विवेकने केला होता.
दरम्यान, ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेकच्या करिअरलाही ब्रेक लागला. तो फारसा कोणत्याच प्रोजेक्टमध्ये झळकला नाही. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली.