T20 WorldCup – टी-२० विश्वचषकमध्ये आज भारताचा सामना बांगलादेशशी खेळला जात आहे. सामान्याच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू अक्षर पटेलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अक्षरच्या जागी दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर बांगलादेशने अष्टपैलू सौम्या सरकारच्या जागी एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजा शरीफुल इस्लामला स्थान दिले आहे.
#ICCRankings | सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेटचा नवा बादशहा, तर विराट कोहली…
या सामन्यात विराट कोहलीने दमदार पारी खेळत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. तो टी-२० विश्वचषकाच्या ( T20 WorldCup ) इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये १६ धावा करताच कोहलीने हा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. याबाबतीत विराटने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.
The greatest in #T20WorldCup history 🔥
Virat Kohli breaks yet another record 👇https://t.co/hpbECiH3xq
— ICC (@ICC) November 2, 2022
टी-२० वर्ल्डकप ( T20 WorldCup ) इतिहासात विराटने २५ सामन्यांमध्ये ८६.०० च्या सरासरीने १०३२ धावा केल्या आहेत. तर महेला जयवर्धनेने ३१ सामन्यात ३९.०७ च्या सरासरीने आणि १३४.७४ च्या स्ट्राईक रेटने १०१६ धावा केलेल्या आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा ३७ सामन्यांमध्ये ९२१ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
विराटने सचिनला टाकले मागे
सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे. ऑस्ट्रेलियात खेळताना विराटने ५७ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ६८ डावांमध्ये ५६.४४ च्या सरासरीने ३३५० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ११ शतक आणि १८ अर्धशतक ठोकले आहेत. याबाबतीत सचिनने ऑस्ट्रेलियात ६७ सामन्यांमध्ये ७ शतके आणि १७ अर्धशतकांसह ४२ च्या सरासरीने ३३०० धावा केलेल्या आहेत.