विकी कौशलने त्याच्या करिअरमध्ये फारच थोड्या अवधीमध्ये मोठी प्रगती केली आहे. मसानमधील त्याचा रोल अजूनही सगळ्यांना आठवत असेल, पण ऍक्शन हिरो म्हणून त्याची छबी “उरी’ मध्येच प्रस्थापित झाली.
पण त्यापूर्वीही त्याने एका महत्वाच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. पण त्याला हा रोल मिळू शकला नव्हता, हे फार कमी जणांना माहिती असेल.
हा सिनेमा म्हणजे “भाग मिल्खा भाग’ होता. त्यामध्ये फरहान अख्तरच्या मित्राच्या रोलसाठी त्याने ऑडिशन दिली होती. त्या ऑडिशनमध्ये त्याला अजिबातच ऍक्टिंग जमली नव्हती.
अखेर ही भूमिकाच काढून टाकली गेली. मात्र या ऑडिशनसाठी त्याला 3 तास तिष्ठत बसावे लागले होते. पण निवड झाली नाही, हे समजल्यावर विकी कौशलला निराशेने ग्रासले. आपल्याला ऍक्टिंगच येत नाही, असे त्याला जाणवायला लागले होते.
अर्थात त्यानंतर विकीने स्वतःचे मनोधैर्य खचू दिले नाही, “मनमर्जियां’ आणि “उरी’सारख्या सिनेमातून त्याने जोरदार ऍक्टिंग करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र प्रारंभीच्या वाईट अनुभव भविष्यात मार्गदर्शक बनले आणि विकी कौशल आज आघाडीचा हिरो बनला आहे.