Rajasthan Lok Sabha Election 2024| राजस्थानमध्ये उर्वरित 13 जागांसाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सातत्याने दौरे करत आहेत. अशोक गेहलोत यांनी उदयपूर गाठून आपले उमेदवार ताराचंद मीणा यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर अनेक गंभीर आरोप केले.
अशोक गेहलोत म्हणाले, “राजकारणात आमचे शत्रू नसतात, भाजप शत्रुत्व जोपासत आहे. ते काँग्रेसला संपवण्याचा, गांधी परिवाराला संपवण्याचा विचार करत आहेत, तुम्ही बेरोजगारीबद्दल बोला, महागाईबद्दल बोला. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकेन, असे मोदी सरकारने सांगितले होते, पैसे कधी येणार? दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार. 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या देणार, 20 कोटी सोडा, एक कोटीही दिले का? हे लोक फक्त खोटी आश्वासने देतात,” असे म्हणत गेहलोत यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे गेहलोत म्हणाले की, “जनहिताशी संबंधित अनेक कामे राजस्थानमध्ये आमच्या मागील सरकारने केली आहेत. कोरोनाच्या काळात राजस्थान सरकारने केलेल्या कामाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. भिलवाडा मॉडेलचे जगभरात कौतुक झाले. आमच्या सरकारने वृद्ध आणि दिव्यांगांचे पेन्शन 750 रुपयांवरून 1 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे काम केले. आम्ही 100 युनिट वीज मोफत दिली. आमच्या सरकारने राज्याच्या हितासाठी यापूर्वी अनेक कामे केली आहेत. खोटे बोलून भाजप सत्तेवर आले.” Rajasthan Lok Sabha Election 2024|
ताराचंद मीणा कोण आहेत? Rajasthan Lok Sabha Election 2024|
काँग्रेसने उदयपूरमधून निवृत्त आयएएस ताराचंद मीणा यांना उमेदवारी दिली आहे. आयएएस ताराचंद मीणा हे मूळचे पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शनचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील बोरीदास मीणा हे शेतकरी होते. ताराचंद मीणा यांचे प्रारंभिक शिक्षण मारवाड जंक्शन येथे झाले. त्यानंतरचे त्यांचे शिक्षण अजमेर येथे झाले. त्यांनी हिंदी साहित्य, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. ताराचंद मीणा हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते जे राज्य नागरी सेवेतून पदोन्नती झालेले होते. त्यांनी निवृत्तीच्या दोन महिने आधीच VRS घेतला.