सोरतापवाडी -उरुळी कांचन (ता. हवेली) येथील करोना बाधित दोन्ही रुग्ण करोनामुक्त झाल्याने उरुळी कांचनकरांना दिलासा मिळला आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी सुचेता कदम यांनी केले आहे.
हवेली तालुक्यातील रुग्णांचा आकडा वाढत असला तरी करोनाचे काही रुग्ण बरे होऊन घरी येत आहेत. पूर्व हवेलीतील उरुळी काचंन येथील महिला व डॉक्टर करोना आजारावर मात करून घरी आल्यावर गावातील नागरिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले.
यावेळी नागरिकांनी उरुळी काचंनच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचेता कदम उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे, उपसरपंच जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यास यश आल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.