नवी दिल्ली – केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज आपल्या हैद्राबादबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आपण आपल्या वक्तव्याबाबत ठाम असल्याचं सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जी किशन रेड्डी यांनी, “देशामध्ये अशी काही शहरं आहेत जेथे दहशवादी कारवायांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याआधी देखील बंगळुरू आणि भोपाळमधील दहशतवादी कारवायांची पाळंमुळं हैद्राबादमध्ये सापडली आहेत. राज्यातील पोलीस खाते आणि एनआयएदेखील दर दोन-तीन महिन्यांमधून हैद्राबादमधून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना अटक करत असते. त्यामुळं मी हैद्राबादबाबत कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाहीये.” अशी भूमिका मांडली.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याच्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या जी किशन रेड्डी यांनी हैद्राबादबाबत केलेल्या वक्तव्याने देशभरामध्ये खळबळ माजली असून जी शेखर रेड्डी यांनी हैद्राबादला ‘दहशतवाद्यांचे माहेरघर’ असं संबोधलं असल्यानं त्यांच्या या वक्तव्यावर सध्या देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, एआयएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी नवनिर्वाचित गृह राज्य मंत्री जी किशन यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी, “जी किशन रेड्डी यांचे हे वक्तव्य त्यांच्या मनात हैद्राबाद आणि तेलंगणाविषयी असलेला द्वेष दर्शवतो. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला अशाप्रकारचं विधान करणं शोभत नाही परंतु रेड्डी यांच्याकडून आम्हाला अशाच प्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा होती. ही लोकं मुस्लिमांना सदैव दहशवादी म्हणूनच पाहतात.” अशी प्रतिक्रिया दिली होती.
गृह राज्य मंत्र्यांनी हैद्राबादला ‘दहशतवाद्यांचा सेफ झोन’ संबोधल्याने ओवैसी कडाडले
MoS (Home) G Kishan Reddy: There are places in country where terror activities are on a rise. If an incident takes place in Bengaluru, Bhopal, its roots are traced to Hyderabad. State police, NIA have arrested terrorists in Hyderabad every 2-3 months. I didn't say anything wrong. pic.twitter.com/EWvQiHJ8V9
— ANI (@ANI) June 1, 2019