उल्हासनगर : उल्हासनगरात मध्यरात्री पर्यंत फटाक्यांची आतिषबाजी होऊन हवेची पातळी अत्यंत धोकादायक झाली. यामुळे सर्वस्तरातून महापालिका व पोलीस प्रशासनावर टीका झाली. त्यानंतर अखेर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणाऱ्या 49 जणांवर महापालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येत कारवाई केली आहे.
मंगळवारी रात्री 10 वाजेनंत्तर फटाके फोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिका व पोलीस विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. तब्बल 49 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी नियमाचे पालन करावे व पर्यावरणपूरक दिपावली साजरी करावी, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले.