नवी दिल्ली – भारत सरकारने आत्मनिर्भर भारत धोरण जाहीर केले आहे. यासाठी उद्योगांचे उत्पादकता आणि दर्जा वाढण्याची गरज आहे. यासाठी 4 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत उद्योग मंथन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात उद्योगासमोरील असलेले अडथळे आणि ते दूर करण्यासाठीच्या पर्यायावर विचार करण्यात येईल. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की विविध क्षेत्रासाठी वेगवेगळे वेबिनार आयोजित करण्यात येतील.
उद्योगांच्या संस्थाबरोबरच राष्ट्रीय उत्पादकता परिषद आणि दर्जा परिषदेचे पदाधिकारी या वेबिनार मध्ये सहभागी होणार आहेत. बुधवारी होणाऱ्या वेबिनार मध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित राहतील.
मॅन्युॅफॅक्चरिंग क्षेत्राबरोबरच व्यापार आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता आणि दर्जा वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जोपर्यंत भारातील कंपन्या दर्जाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत भारतीय उत्पादनाची निर्यात वाढणार नाही. यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. प्रत्येक वेबीनार दोन तासाचा असेल.