मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. ७ नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही चर्चा होत नसून विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान राज्यात सत्तास्थापनाच्या घडामोंडींना वेग आलेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.