दुबई – संयुक्त अरब अमिरातीने भारतातून येणाऱ्या विमानांना दहा दिवसांची बंदी लागू केली आहे. ही बंदी शनिवारी मध्यरात्री बारा वाजता लागू होईल. त्यामुळे त्या आधी विमान गाठण्यासाठी प्रवाशांची धावाधाव सुरू झाली आहे.
गेल्या 14 दिवसांत ज्यांनी भारतात प्रवास केला आहे त्यांनाही संयुक्त अरब अमिरातीने आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे.
संयुक्त अरब अमिरातीतून जाणाऱ्या विमानांना मात्र ही बंदी लागू असणार नाही तसेच संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांनाही ही बंदी लागू असणार नाही. त्यांना भारतातून परत येण्यास अनुमती असणार आहे. पण त्यांना भारतात जाण्यास अनुमती असणार नाही.
तथापि, ज्यांना यूएईमध्ये परतायचे आहे त्यांनी शनिवारी मध्यरात्रीपर्यंतची विमानाची तिकिटे मिळवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.