शेलपिंपळगाव – खेड तालुक्यात दोन तासाच्या पावसाने शेतकऱ्यांनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चऱ्होली खुर्द येथील शेतकरी पांडुरंग थोरवे, धनंजय थोरवे यांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने जनावरांना पाण्यातच मुक्काम करावा लागला असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
गावातील काही नागरिकांनी स्वतःच्या फायद्या साठी नैसर्गिक ओढा बुजवल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून लवकर नैसर्गिक ओढा अतिक्रमण
मुक्त करून नागरिकांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक दिवसांन पासून बुजवण्यात आलेला ओढा पुन्हा जसा होता तसाच व्हावा यासाठी अनिकेत कुऱ्हाडे , पांडुरंग थोरवे , धनंजय थोरवे , प्रताप थोरवे , रामदास घोलप , रंजीत पगडे ,
सचिन थोरवे , गणेश थोरवे , पांडाभाऊ थोरवे , धनंजय थोरवे , सुनिल थोरवे हे शेतकरी पाठपुरावा करत असून अजूनही प्रशासनाला जाग आली नाही का असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
तलाठी ठाकुर व कर्मचारी निलेश शिंदे यांनी गोठ्याची व इतर परिसराची पाहणी करणार असून तात्काळ पंचणामा ही केला जाणार असल्याचे फोन वरून शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे.