सांगली – बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते. असं म्हणत तुषार गांधी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे.
सांगली मध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील ‘प्रति सरकारचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तुषार गांधी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,’ सभोवताली अन्याय अत्याचार सुरू असताना आपण गप्प बसलो आहोत. लोकशाही जीवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकशाही नालायक होत चालली आहे, असं म्हणत तुषार गांधी यांनी म्हटले
ते पुढे म्हणाले, 75 वर्षात आदर्श पात्र लोकं इतिहासातच का राहिले? महाराष्ट्राची परिस्थिती आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिसरकारची गरज वाटत नाही का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या राज्यात गद्दारांची संख्या आहे. स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणारे आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणारे, अशा दोन प्रकारच्या गद्दारांची मिळून सध्या राज्यात सत्ता आहे, अशी टीका तुषार गांधी यांनी केली.