नारायणगाव – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव व वारूळवाडी परिसरात आज (दि. 19) पासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत दैनंदिन व्यवहार सुरु राहणार असून इतर वेळेत सर्व व्यापार, दैनंदिन व्यवहार बंद राहणार असल्याचे नारायणगाव ग्रामपंचायतीने आवाहन करून प्रसिद्धपत्रक काढले आहे.
तसेच शहरातील सर्व मुख्य चौकात खबरदारीसाठी टाकी ठेवून हात-पाय धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. करोनामुळे खबदारीच्या उपाययोजना करण्यासाठी जुन्नर तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नारायणगाव व ग्रामपंचायत वारूळवाडी यांनी जनजागृती करून भित्तीपत्रके, फ्लेक्स, सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे.
नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाळून खबरदारी घेत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने शहरात सोडियम हेपोक्लोराइडची फवारणी सुरु केली आहे. अशी माहिती ग्रामपंचाय सदस्य राजेश बाप्ते यांनी दिली.