पालघर – पालघर जिल्ह्यातील विरार शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान वाहनावर लावलेल्या लोखंडी ध्वजाच्या खांबाचा विद्युत ट्रान्सफॉर्मरशी संपर्क आल्याने विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
पाच जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही मिरवणूक रात्री 10.30 च्या सुमारास संपत असताना वाहनावर लावलेला लोखंडी ध्वज रस्त्याकडेला असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आला. त्यातून ही घटना घडली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच जण जखमी झाले. रूपेश सुर्वे (23) आणि सुमित सूद (30) अशी मृतांची नावे आहेत.