पवनानगर – मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा येथे ओढा आहे. पवना धरणाकाठी असलेल्या टेंट चालकांमुळे पर्यटनाला चालना मिळत असल्याचे मत आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही टेंट चालकांची भेट घेऊन आपण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
मावळ तालुक्यात असलेल्या लोणावळा परिसरात पर्यटक येत असतात. पावसाळ्यात तर भुशी डॅमवर गर्दीचा महापूर येतो. याशिवाय कार्ला व तालुक्यातील गडकिल्ल्यांवर बाराही महिने गर्दी असते. तसेच पवना धरणावरही पर्यटक येत असतात. त्यांना अल्पदरात राहण्याची सुविधा टेंट चालकांकडून दिली जाते. त्यांच्यामुळे मावळच्या पर्यटनाला चालना मिळते, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
तर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील टेंट चालकांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसेच टेंट चालकांच्या समस्या सोडविण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. तसेच टेंट चालक धरणग्रस्तांचे आपण पुनर्वसन केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचेही भेगडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड,युवा अध्यक्ष नितीन मराठे, गणेश ठाकर, सरपंच नारायण बोडके, अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, उपाध्यक्ष किसन खैरे, खजिनदार संजय मोहोळ, दत्तात्रय ठाकर, नारायण ठाकर,प्रकाश ठाकर, कॅम्प चालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.