मुंबई – टोकियो ऑलिम्पिकला येत्या 23 जुलैपासून प्रारंभ होत आहे. भारताच्या 126 खेळाडूंपैकी 8 खेळाडू महाराष्ट्राचे आहेत. हे खेळाडू यंदा टोकियोतून पदक जिंकून परतणार का याकडेच लक्ष राहणार आहे.
विविध 18 क्रीडा प्रकारात भारताचे 126 भारतीय खेळाडू सहभाग घेणार असून येत्या शनिवारी देशाचे पथक जपानला रवाना होत आहे. भारत आतापर्यंत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक 126 खेळाडू प्रथमच पाठवणार आहे. त्यामुळे यंदा भारतीय खेळाडू जास्तीत जास्त पदके भारताला मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या पथकातील महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रातील 8 खेळाडूंपैकी सर्वाधिक खेळाडू हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापुरातील तीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार आहेत. यामध्ये नेमबाजी प्रकारात तेजस्वीनी सांवतसह राही सरनोबत सहभाग घेणार आहे. तर पॅरा शूटिंग प्रकारात स्वरुप उन्हाळकर सहभागी होणार आहे.
यावेळी भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
खेळाडू व क्रीडा प्रकार…