पुणे – लॉक डाऊनमध्ये घराचे हप्ते थकल्याने एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरमालकिणीशी हप्त्यावरुण आणि इतर कारणांने वाद झाल्यावर तीने हे टोकाचे पाऊल उचलले संबंधीत महिलेमागे तीचा पती आणि दोन मुले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन महिलांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
वैशाली राऊळ (30,रा.आंबेगाव खुर्द ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तीच्या पतीने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनूसार वैशाली आणि तीच्या पतीने यातील एका आरोपी महिलेकडून घर विकत घेतले होते. हे घर विकत घेताना दर महिन्याला ठराविक हप्ते देण्याचे ठरले होते. घरमालकिणीच्या शेजारीलच सदनिका त्यांनी घेतली होती.
लॉक डाऊनच्या दरम्यान त्यांना घराचे दोन तीन हप्ते भरता आले नाहीत. यावरुण मालकिणीशी तीचे वाद झाले. तसेच इतरही कारणावरुण मालकिण तीला त्रास देत होती. हा त्रास सहन न झाल्याने तीने तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए.आर.कवठेकर करत आहेत