बेल्हे : राजुरी येथील गटकळ मळयात पाच दिवसांपुर्वी आढळलेली बिबटयाची तीन पिल्ले शुक्रवार (दि.६) रोजी पुन्हा आढळल्याने या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की राजुरी (ता.जुन्नर) येथील गटकळ मळयामधील शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या शेतात पाच दिवसांपूर्वी ऊस तोडणी चालु असताना तीन लहान लहान साधारणपणे एक ते दिड महीण्याची बिबटयाची पिल्ले आढळुन आली होती.
त्यानंतर या पिल्लांची आई याच शेतात आहे असे वनविभागाचे अधिकारी जे.बी.सानप यांनी सांगितल्याने या पिल्लांणा याच शेताच्या दुसऱ्या बाजुला ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या पिल्लांना त्यांंची आई घेऊन गेली होती. परंतु येथील शेतकऱ्याची ऊस तोडणी दोन दिवस बंद ठेवली होती व काल पहील्यांदा ज्या शेतात ही पिल्ले आढळली होती. त्या शेतातील ऊस तोडल्यानंतर त्या ठिकाणी पिल्ले दिसली नाही व शुक्रवार (दि.६)रोजी याच शेतकऱ्याच्या दुसऱ्या शेतात ऊस तोडणी चालु असताना ही बिबटयाची पिल्ले पुन्हा आढळुन आली आहे.
दरम्यान राजुरी हे गाव बिबटया प्रवण क्षेत्रात मोडत असुन आज ज्या ठिकाणी बिबटयाची पिल्ले आढळली आहेत त्या पासुन काही अंतरावर असलेले बोरबन मळयात मंगल सुदाम शेटे ही महीला आपल्या शेतात गहू कापत असताणा बिबटयाने अचानक पणे पाठीमागून हल्ला केला होता.
सुदैवाने ही महीला जोरात आरडल्याने बिबटयाने या ठिकाणाहून पळ काढला.तरी या बिबटयांणा पकडण्यासाठी वनविभागाचे काहीतरी ठोस पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.तसेच आज ही पिल्ले ज्या ठिकाणी आढळली आहेत त्याच शेतात ठेवुन या ठिकाणी असलेल्या त्या पिल्लांच्या आईला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.