बेल्हे – पेमदरा (ता.जुन्नर) येथील कल्याण-नगर महामार्गापासून ते कारेवाडी ला जोडणारा दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या तीन पिढ्यांपासून वादात पडला होता. गावचे सरपंच रंगनाथ बेलकर यांनी संबंधित शेतकरी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सामंजस्यपणाने रस्त्याचा मार्ग काढला.
रस्त्याचा मार्ग निघाल्यावर ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून या रस्त्यावरून तात्काळ मुरमीकरण केल असून हा रस्ता आता सर्वांना वापरासाठी खुला झाला आहे. ग्रामस्थ व गावचे सरपंच रंगनाथ बेलकर यांनी रस्त्याला जागा देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच रंगनाथ बेलकर, बाळासाहेब दाते ,गंगाराम बेलकर,भाऊसाहेब दाते,मंजाबापू दाते,बाळू बेलकर,अर्जुन बेलकर,विठ्ठल बेलकर,भास्कर बेलकर,विलास बेलकर,सोनभाऊ बेलकर आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.