कर्नाटक : भारतात आजही अंधश्रद्धा दिसून येतात. गुरुवारी सूर्यग्रहणावेळी अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. सूर्यग्रहणावेळी नातेवाईकांनी त्यांच्या अपंग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरले.
ही घटना कर्नाटकातील कलाबुरागी ताजसुल्तानपुर या गावीची आहे. सूर्यग्रहणानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या तीन दिव्यांग मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरले. या तिन्ही मुलांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ खड्ड्यात ठेवल्याचे सांगण्यात आले.
https://twitter.com/ANI/status/1210130614118010887
ग्रहण संपल्यानंतरच मुलांना खड्ड्यातून काढण्यात आले. त्यांच्या पालकांचा असा विश्वास होता की असे केल्याने त्यांची मुले नारे होतील. घट्नेच्यी माहिती मिळताच जनवादी संघटनेच्या कार्यकर्त्या अश्विनीने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर माजी आमदार बीआर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मुलांना बाहेर काढण्यास सांगितले.
आजही भारतात सूर्यग्रहणास धार्मिक महत्त्व आहे. सूर्यग्रहणावेळी विशेष पूजा केली जाते. गुरुवार सकाळी 8:17 वाजता सूर्यग्रहण सुरू झाले असून 11 वाजेपर्यंत चालू होते.