पुणे -स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगाचा संकल्प केला असून, धनकवडीचे माजी नगसेवक मोहिनी देवकर अणि परिसातील विविध सामजिक सेवाभावी संस्था यांच्याकडून कात्रज, धनकवडी, आंबेगाव परिसरात हजारो राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’चा संकल्प केला आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून; स्वातंत्र्यसैनिक आणि आपल्या जवानांना स्मरण करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धनकवडी आंबेगाव कात्रज परिसरात प्रत्येक कुटुंबाच्या घरावर राष्ट्रध्वज लागला पाहिजे, यासाठी माजी नगरसेविका मोहिनी देवकर आग्रही असून, त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास हजारो राष्ट्रध्वजाचे वाटप केले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी आणि सोसायटीमध्ये जाऊन राष्ट्रध्वाजाचे वाटप केले. तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरी राष्ट्रध्वज लावण्याचा आग्रह धरला.
दरम्यान, हर घर तिरंगासाठी आज 14 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीत विविध सेवा भावी संस्था हे देखील सहभागी होऊन सर्व धनकवडी वासियांना हर घर तिरंगासाठी आवाहन करणार आहेत.
याचं बरोबर आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी परिसरात स्थिर ढोल ताशांचे वादन करण्यात येणार आहे.