प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -देशाच्या उत्तरेकडील काश्मीर हा अतिशय दुर्गम भाग आहे. केवळ राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय आयाम या भागाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषय असला, तर काश्मीर हे कायमच केंद्रस्थानी येते, असे मत काश्मीरमधील आयएएस अधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी व्यक्त केले.
“परिवर्तन’ संस्थेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काश्मीरमधील दुर्गम गावांमध्ये एक हजार ध्वज पाठवण्यात आले. यावेळी डॉ. के. एच. संचेती, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, नलिनी कुमार, मनीषा संघवी, डॉ. कर्नल पंडीता, राहुल चोभे, अखिलेश झांजले उपस्थित होते.
संस्थेने सन 1997 मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ध्वज वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. या उपक्रमाचा यंदा रौप्यमहोत्सव आहे, अशी माहिती डॉ. गुजर यांनी दि