मुंबई- भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून पुढील महिन्यात वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात एकूण 6 मर्यादित षटकांचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पण देशात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढल्याने बीसीसीआयसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे आता वेळापत्रकात बदल करत एकाच ठिकाणी दोन सामने आयोजन करण्याची शक्यता आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. य दोन्ही संघात प्रथम एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर टी-20 सिरीज खेळवली जाईल.
या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे. तर दि. 9 आणि दि. 12 फेब्रुवारीला होणाऱ्या दोन एकदिवसीय सामने ईडन गार्डनवर होतील. या वेळापत्रकानुसार 9 फेब्रुवारीला जयपूरला दुसरा एकदिवसीय सामना होणार होता, पण तो आता कोलकात्यामध्ये होऊ शकते.
यानंतर कटक, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपूरममध्ये 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान 3 टी-20 मालिका सिरीज होणार आहे, पण करोना रुग्ण वाढल्यामुळे प्रवास कमी करण्याच्या दृष्टीने 6 ऐवजी 3 ठिकाणी सामने होऊ शकतात. वेस्ट इंडिजचा संघ 1 फेब्रुवारीला अहमदाबादला पोहोचणार आहे. यानंतर ते 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.