अहमदाबाद – भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली असली तरीही नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याने काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. संघात सुधारणेला खूप वाव असल्याचे त्याने म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. भारताचा हा 1 हजारावा एकदिवसीय सामना होता. या ऐतिहासिक विजयासह रोहितने आपल्या नेतृत्वयुगाला प्रारंभ केला. मात्र, तरीही त्याने संघाच्या कामगिरीत अद्याप खूप सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
एक संघ म्हणून आम्हाला अद्याप खूप मोठी मजल मारायची आहे. संघाला जे यश हवे आहे ते साध्य करणे हेच अंतिम ध्येय आहे. जर संघाला काही वेगळे करायचे असेल, तर त्यासठी वाट्टेल तीतकी मेहनत घेण्याची तयारी हवी. खेळाडूंनी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माझा परफेक्टफ खेळावर विश्वास नाही. तुम्ही शंभर टक्के परिपूर्ण होऊ शकत नाही. पण सगळ्यांनी सांघिक खेळ केला तर काहही शक्य आहे. मात्र, यापुढील लढतींमध्ये धावांचा पाठलाग करताना फलंदाजांनी जास्त जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे आहे, असे रोहित म्हणाला.