आळंदी -शहरामध्ये विविध ठिकाणी रात्रीच्या वेळेस वयस्कर नागरिक मंदिर परिसरात, इंद्रायणी नदी तिरी आणि इतर ठिकाणी झोपलेली असतात. तसेच परिसरात नागरिकांची ये-जा सुरू असते, अशा ठिकाणी पथदिव्यांचे खांब उपलब्ध असून
सुद्धा ते बंद आहेत जर ते येत्या दोन दिवसांत सुरू झाले नाही तर आळंदी नगरपरिषद समोर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.