सातारा – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारत सर्वच्या सर्व 21 जागांवर तीन हजारांवर मताधिक्याने मोठा दणदणीत विजय मिळवत मदन भोसले यांची पंधरा वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे.
संस्था मतदारसंघातून ामदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले व त्यांचे पॅनेलला मोठी पराभव स्वीकारावा लागला. सायंकाळी पाचनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. कारकान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही तालुक्यात रात्री उशीरापर्यत विजयी उमेदवारांच्या मिरवणुका सुरु होत्या. किसन वीर कारखाना निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून वाई औद्योगिक वसाहतीमधील श्रीनिवास मंगल कार्यालयात सुरु झाली. मतदान प्रक्रिया 154 मतदान केंद्रांवर पार पडली होती. त्यापैकी निम्म्या म्हणजे 77 मतदान केंद्रांची पहिल्या फेरीत मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला संस्था व ऊसउत्पादक गट यांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्यक्ष मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर एकूण कल पाहता आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलला मतदारांनी पहिली पसंती दिल्याचे स्पष्ट होत गेले.
किसन वीर कारखाना निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून वाई औद्योगिक वसाहतीमधील श्रीनिवास मंगल कार्यालयात सुरु झाली. मतदान प्रक्रिया 154 मतदान केंद्रांवर पार पडली होती. त्यापैकी निम्म्या म्हणजे 77 मतदान केंद्रांची पहिल्या फेरीत मतमोजणी सुरू झाली. सुरवातीला संस्था व ऊसउत्पादक गट यांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्यक्ष मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर एकूण कल पाहता आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलला मतदारांनी पहिली पसंती दिल्याचे स्पष्ट होत गेले.
मतमोजणी पुढे होत गेली तसतशी दोन्हीं पॅनेलमधील मतांचा फरक वाढत गेला. मदन भोसले यांचे पॅनेल पिछाडीवर पडत असल्याचे स्पष्ट होत गेले. यामुळे निकालाचा कल पाटील बंधू व त्यांच्या पॅनेलच्या बाजूने झुकला असल्याचे स्पष्ट झाले होते.
सोसायटी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे आ. मकरंद पाटील यांनी मोठी आघाडी घेतल्याने विद्यमान संचालक रतनसिंह शिंदे पहिल्या फेरीपासून मागे पडले. या मतदारसंघातून पहिल्या फेरीअखेर आ. मकरंद पाटील यांना 113 तर शेतकरी पॅनेलचे रतनसिंह शिंदे यांना 58 मते पडली होती. अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे उमेदवार संजय कांबळे यांना 11 हजार 117 तर शेतकरी पॅनेलचे सुभाष खुडे यांना 7 हजार 46 मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून हणमंत चवरे यांना 10 हजार 982 तर चंद्रकांत काळे यांना 7 हजार 194 मते मिळाली. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे शिवाजी जमदाडे यांना 11 हजार 31 मते मिळाली तर आनंदा जमदाडे यांना 7 हजार 117 मते मिळाली. महिला गटातून सरला वीर यांना 10 हजार 710 मते तर सुशीला जाधव यांना 10 हजार 215 मते मिळाली. आशा फाळके यांना 6 हजार 971 तर विजया साबळे यांना 6 हजार 877 मते मिळाली. ऊस उत्पादक कवठे खंडाळा गट क्रमांक 1 मध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे रामदास गाढवे यांना 10 हजार 810 मते मिळाली तर संस्थापक शेतकरी पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय गाढवे यांना 6 हजार 863 मते मिळाली. नितीन जाधव पाटील यांना 10 हजार 877 व विरोधी पॅनेलचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 6 हजार 807 मते मिळाली. शेतकरी बचाव पॅनेलचे किरण काळोखे यांना 10 हजार 771 तर विरोधी पॅनेलचे उमेदवार प्रताप यादव यांना 6 हजार 801 मते मिळाली. दोन्हीं पॅनेलच्या मतांमध्ये जवळपास चार हजार मतांचा फरक आहे. शेतकरी बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने घौड दौड सुरू आहे. एकूणच पहल्यिा फेरीअखेर विजयाचे चत्रि स्पष्ट झाले आहे.
इतर गटातील पहिल्या फेरीअखेर दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे
ऊस उत्पादक भुईंज. गट क्रमांक 2 – मदन भोसले ( 7 हजार 81), प्रकाश धुरगुडे (10 हजार 583), रामदास इथापे (10 हजार 497), दिलीप शिंदे (6 हजार 669), मानसिंग शिंगटे (अपक्ष 75 मते), प्रमोद शिंदे (10 हजार 451), जयवंत पवार (6 हजार 885). बावधन जावळी गट क्रमांक 3 – सचिन भोसले (7 हजार 1), विश्वास पाडळे ( 6 हजार 808), दिलीप पिसाळ ( 10 हजार 907), शशिकांत पिसाळ ( 10 हजार 757), चंद्रसेन शिंदे ( 6 हजार 708), हिंदुराव तरडे (10 हजार 712). सातारा गट क्रमांक 4 – संदीप चव्हाण (10 हजार 869), चंद्रकांत इंगवले ( 6 हजार 847), भुंजगराव जाधव ( 6 हजार 883), सचिन जाधव (10 हजार 816), बाबासाहेब कदम (10 हजार 735), नवनाथ साबळे ( 61), अनिल वाघमळे ( 6 हजार 590). कोरेगाव गट क्रमांक 5 – मेघराज भोईटे ( 6 हजार 950), नवनाथ केंजळे ( 6हजार 754), शिवाजी पवार ( 6 हजार 752), दिलीप जाधव ( 52), ललित मुळीक (10 हजार 584), रमेश माने (39),संजय फाळके (10 हजार 579), सचिन साळुंखे (10 हजार 719).
दुसऱ्या फेरीत 17 हजार मते मोजली गेली. यामध्ये सोसायटी गटातून आ. मकरंद पाटील 238 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार रतन शिंदे यांना 91 मते मिळाली. अनुसूचित जाती मतदारसंघामधून संजय कांबळे तब्ब्ल 9 हजार 926 मतांनी विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून हणमंत चवरे विजयी झाले. त्यांनी चंद्रकांत काळे यांचा पराभव केला. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून शेतकरी बचाव पॅनेलचे शिवाजी जमदाडे विजयी झाले. महिला राखीव गटातून सरला वीर याही मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. कवठे खंडाळा गट क्रमांक 1 मध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे रामदास गाढवे विजयी झाले. नितीन जाधव- पाटील हेही याच गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. भुईंज गट क्रमांक 2 मध्ये विद्यमान चेअरमन मदन भोसले यांचा दारुण पराभव झाला. त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश धुरगुडे मोठ्या फरकाने विजयी झाले. याशिवाय शेतकरी बचाव पॅनेलचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
मकरंदआबा आणि विजय… हेच समीकरण
वाई मतदारसंघात आ. मकरंद पाटील आणि विजय हे समीकरणच होऊन बसले आहे. मग निवडणूक कोणतीही असो, एकदा निवडणूक हातात घेतली की समजायचं विरोधकांचे निश्चितच पानिपत. 24 तास संपर्कात असेलला आमदार म्हणून आबांची ओळख आहे. राज्यातील सर्वात मोठ्या मतदारसंघाचे ते गेली तीन टर्म प्रतिनिधित्व करीत आहेत. आज अनेक अशी गाव आहेत की त्याठिकाणी त्यांना शंभर टक्के मतदान होते. राजकारणातील अचूक डावपेच आणि गावपातळीवर कार्यकर्त्याची भली मोठी फौज यामुळे निवडणूक स्थानिक असो की आमदारकीची, कार्यकर्ते आबांसाठी जीवाचं रान करतात हे पुन्हा दिसून आले. “किसन वीर’ची निवडणूक एकतर्फी जिंकून दाखवत मकरंद पाटील यांनी आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध केलं आहे.