नगर, (प्रतिनिधी) – गेल्या शहरात आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी जमा झाले आहे. रस्ते आधीच खराब आहेत. त्यात आता पावसाच्या पाण्याने आणखी खराब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. रस्त्यांत मोठे खड्डे आहेत. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. या खड्ड्यामुळे वाहतूकीची कोंडी जागोजागी होत आहे.
या पावसाच्या आधी काही दिवसांपूर्वी रस्ते दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर थोड्याच दिवसात रस्ते पुन्हा खराब झाले. पाऊसही पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब आहेत. या रस्त्यांप्रमाणेच शहरातून जाणारे महामार्ग देखील खराब झाले आहेत. मनमाड महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी बारीक खडी रस्त्यात पसरली आहे. पावसामुळे रस्त्याच्या कडेला चिखल आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांबाबत सातत्याने या समस्या उद्भवत आहेत. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
महापालिकेने दोन दिवसांपूर्वी खड्डे बुजविले. मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा खटाटोप केला. परंतु पुन्हा झालेल्या पावसामुळे हा मुरूम देखील वाहून गेला आहे. खड्डे पडले असून खड्डी बाजूला झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डी साठली आहे. शहरातील सर्वच रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डे चुकवितच मार्ग काढावा लागत आहे. त्यातून किरकोळ अपघात देखील होत आहे. खड्डा न दिसल्याने रात्रीच्यावेळी अनेक अपघात झाले आहे. खड्डी रस्त्यावर पडल्याने दुचाकी वाहने घसरत आहेत. रस्त्यांची चाळणच झाल्याने कोठे -कोठे रस्ते बुजविणार असा प्रश्न पडला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष आहे. केवळ महापालिका हद्दीतील रस्ते नाही तर महामार्गची अवस्था तशी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत नगरकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.