पुणे – संस्थास्तरावरील नियमबाह्य प्रवेशाच्या तक्रारीवरून शहरातील नामांकित तीन अभियांत्रिकी महाविद्यालयाची चौकशी क रण्यात येणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून, त्याचा अहवाल सादर क रण्याचे आदेश राज्य सीईटी सेलने दिले आहे. त्यामुळे संस्थाचालकांची धाबे दणाणले आहे.
मुंबईतील राज्य सीईटी सेलमार्फत पुण्यासह राज्यातील अभियांत्रिकी महा विद्यालयातील प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यलयात प्रवेशासाठी निवड केली जाते. त्यानुसार विद्यार्थ्याने संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा असतो. केंद्रीय प्रवेश पद्धतीने ही सर्व प्रवेशप्रक्रिया होत असून, त्यासाठी यंदा दोन फेरी घेण्यात आली. त्यानंतर जागा रिक्त राहिल्यानंतर राज्य सीईटी सेलने संस्थांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची परवानगी दिली होती.
दरम्यान, शहरातील तीन अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थास्तरावर प्रवेश होत असताना त्यात नियमबाह्य पद्धतीने ही प्रक्रिया झाल्याची तक्रार पालकांनी राज्य सीईटी सेलकडे केली आहे. एका महाविद्यालयात त्याबाबत तक्रार के ल्यानंतर त्याठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्य सीईटी सेलने चौकशी करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार समिती नेमली आहे. समिती लवकरच प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन सर्व सत्यता तपासून, त्याचा अहवाल सादर करेल.
– डॉ. डी. व्ही. जाधव, सहसंचालक, पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभाग
पुण्यातील तीन अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थास्तरावर परस्पर पद्धतीने प्रवेश दिल्याची पालकांची तक्रार आली होती. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ते चौकशी करून, त्याचा अहवाल प्रवेश नियामक प्राधिक रणाकडे सादर करतील. त्यानुसार पुढील कर्यवाही होईल.
– चिंतामणी जोशी, आयुक्त, राज्य सीईटी सेल